Posted on 02 Nov, 2017 10:10 am

Likes - 0 615


तुझ्यात जीव रंगला’ च शूटिंग बंद करण्याची मागणी...

प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलेली मालिका 'तुझ्यात जीव रंगला 'चा कोलाहापुरात कल्ला सुरु झाला आहे. कोल्हापूरच्या ज्या गावामध्ये ह्या मालिकेच चित्रीकरण सुरु आहे तिथल्या लोकांनी ह्या मालिकेच चित्रीकरण थांबवण्याची मागणी करत ग्रामपंचायतीकडे निवेदन दिल आहे.

गेल्या वर्षापासून कोल्हापुरातल्या 'वसगडे' ह्या गावामध्ये मालिकेच शुटिंग सुरु आहे. आणि दर शनिवारी, रविवारी किंवा इतर सुट्ट्यांच्या दिवशी ह्या मालिकेच चित्रीकरण पाहण्यासाठी इथे चाहत्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. त्यांच्या आवडत्या कलाकारांना किंवा ह्या सेटची एक झलक पहायला मिळावी म्हणून अक्षरशः प्रेक्षक गर्दी करत असतात. मालिकेच्या सेटवर मात्र चाहत्यांच्या गर्दीमुळे मालिकेच्या शुटींगला त्रास होत असतो. शिवाय इतर गावकर्यांनाहि ह्याचा त्रास होतोय असे गावकर्यांचे म्हणणे आहे. 

तसेच ह्या मालिकेचे जे शुटींग चालू आहे त्या वाड्याचे जे मूळ मालक आहेत त्यांनी गावकर्यांना अर्वाच्य भाषेत बोलल्याची व शिवीगाळ केल्याची तक्रार गावकर्यांनी केली आहे त्यामुळे हे प्रकरण चिगळले आहे असे दिसतेय. 

वसगडे गावात ह्या मालिकेचे आवडते सगळे कलाकार एक दिवस ठरवून गावातल्या लोकांशी तसेच इतर आलेल्या चाहत्यांची संवाद साधतात सगळ्यात जास्त चाहते हे राणादादा म्हणजेच हार्दिक जोशी आणि अंजली बाई म्हणजेच अक्षया देवधर ह्यांना पहायला येतात.